संतोष देशमुख प्रकरण हे अतिशय दुर्दैवी; उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया

संतोष देशमुख प्रकरण हे अतिशय दुर्दैवी; उपमुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया

सातारा : (जितेंद्र जगताप)
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “संतोष देशमुख प्रकरण हे अतिशय दुर्दैवी आहे, ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अतिशय निर्घृणपणे हत्या झाली आहे. शासनाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वतः सीआयडी आणि एसआयटी लावलेली आहे. यातील एकही आरोपी सुटणार नाहीत. कोणाशीही लागेबांधे असले तरी सरकार कुणाला पाठीशी घालणार नाही. आरोपींना फाशी सारखी शिक्षा द्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे केली जाणार आहे. फास्टट्रॅकवर हा खटला चालवला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *